Posts

Showing posts from October, 2024

माझ्या काही कविता

  तुम्हा वाचकांच्या आग्रहाला मान देऊन मी दोन कविता आपणापुढे सादर करीत आहे , पहिली कविता "सागर किनारी" जी १९७४ मध्ये रेडिओवर वाचली होती आणि दुसरी आहे “ घर ” जी नोव्हेंबर १९७७ मध्ये प्रसिद्ध झाली होती .   सागर किनारी निऑन साईंनची चमक काळोखाची पार्श्वभूमी खारा भणभणता वारा सळसळणारे समुद्रजल   फडफडणारी दिवटी धडधडणारा उर खदखदणारा अंधार हिरमुसलेला प्रकाश   टिळकांचा पुतळा अपुरा उजेड चबुतऱ्याजवळ कबुतरे निर्मळ   दूरवर समुद्रात मिणमिणारी होडी उसळ्या मारणाऱ्या लाटा खोलवर डुचमळणाऱ्या सावल्या   हळुवार गुंफणारे नाते थरथरते मऊ वाळूत ती लाजते , नजर सावरते गुंफते , हात , हातात     घर या आकाशाच्या पंखांना आधार देत माझ्या आसवांचे मी बांधायला सांगितले होते एक घर , एक दार ! ज्याला सीमा नसतील ज्याला आकार नसेल ज्याला रंग नसेल असे अस्पर्शित अपश्यत ! पण मिळाले , काय तर दुःखांच्या सीमांनी मर्यादित निराशेच्या भुतांनी व्यापलेलं आणि उदासीनतेच्या रंगाने न्हालेलं हे हाडा-मासाचे घर ! ह...

युवा वाणी कार्यक्रम - आकाशवाणी

Image
  ६ जानेवारी १९७४ , पोदार कॉमर्स कॉलेज मध्ये एफ वाय ला प्रवेश घेऊन सहाच महिने लोटले होते. मराठी मिडीयम मधून आल्यामुळे हा कोर्स आपल्याला झेपतो कि नाही अशी भीती वाटत होती. पण पहिल्या मिड टर्म मध्ये सर्व   विषयात पास झालो आणि म्हटलं सुटलो. तो अभ्यास नीट करताना काव्यलेखनाचा अभ्यास कधी सुरु झाला कळलं नाही. हा अभ्यास करता करता कविता सुचायला लागल्या. आमचे राम पटवर्धन सर मराठी गद्य पद्य वेचे शिकवत असताना कवितांचे तास जास्त आवडू लागले. पण त्या सिद्धहस्त कवींच्या कविता अतिशय उत्कृष्ट होत्या. त्यामुळे माझ्या कवितांची वही फाडून टाकायचा निर्णय घेतला परंतु वही फाडण्याधी माझा खास मित्र दीपक जोशी याला वाचायला दिली. वाचल्यावर तो म्हणाला कि एवढ्या काही वाईट नाहीत. वही फाडू नकोस. लिहीत रहा. मग माझा मित्र,   माझा गुरु , माझा टीकाकार,  दीपक याच्या प्रोत्साहनामुळे मी  कविता लिहीतच राहिलो. माझ्या कवितांना साभार परत यायची व्याधी जडली होती. पण दोन तीन कविता अश्वमेध मासिकात आणि नवशक्ती दैनिकात प्रसिद्ध झाल्या. पटवर्धन सरां ना  माझ्या कवितांमध्ये काही काव्य गुण...